होताच भेट तुझी, श्वासही मंदावतो
बोलतात फक्त डोळे, अन जीव वेडावतो ॥
जाणीव या जीवाची, जाहली जरी तुलाही
डोळेच साद घाली, तो माझा प्रांत नाही ॥
रमले जरी म्हणावे, मन माझे हरलेले
चिंता याचीच आता, पुन्हा कसे परतावे ?
बदलूनी मार्ग सारे, अंती पुन्हा तिथेच
शंका दाट झाली..... कळले
अपुला अंतही इथेच !