ग्राहका, फसवणुकीच्या "आयडीयांपासून" सावधान...!!!

खाली दिलेला प्रसंग नीट वाचा म्हणजे कदाचीत हे पुन्हा दुसऱ्या कुणासोबर घडणार नाही:

"माझा आयडियाचा प्रीपेड मोबाईल तीन वर्षांपासून आहे आणि तेही व्यवस्थित कागदपत्रके देवून घेतलेला आहे.
अचानक मला सप्टेंबर २०१० ला एस एम एस आला की कागदपत्रके जमा करा.
४ ऑक्टोबरला कागदपत्रके पूर्ण पणे भरून, तसेच फोटो देवूनही दसऱ्याला १७ ऑक्टॉबरला मोबाईल चे कॉल बंद झाले.
१६ तारखेला परत एस एम एस आला होता की कागदपत्रके परत जमा करा.
दसऱ्याला १७ ऑक्टॉबरला त्रास सहन करावा लागला तो वेगळाच.
ऑफिसचे कॉल महत्त्वाचे असल्या कारणाने मी दुसऱ्या कंपनीचा नंबर घेतला.
मग काही दिवस आयडीयाचे ऑफिस बंद होते.
 मग मी एक दिवशी पुन्हा कागदपत्रके दिली कारण जुना नंबर अनेकांना दिला सल्याने तो बंद करणे योग्य वाटले नाही.
पूर्वीचा नंबर चालू झाला. मी कस्टमर केअरला विचारून खात्री सुद्धा केली, की माझा अॅड्रेस वगैरे सर्व पोहोचले आहे का.
ते हो म्हणाले.
पुन्हा दिवाळीच्या आदल्या दिवशी एसएमेस आला की कागदपत्रके अपूर्ण आहेत, ते द्या अन्यथा सेवा बंद करण्यात येईल.
मी कॉल केल्यावर ते म्हणाले की कागदपत्रके पुन्हा जमा करावी लागतील.
त्याचे कारण विचारले असता त्यांनी कारण सांगितले नाही.
फक्त पुन्हा कागदपत्रके पाहिजेतच असे सांगितले.
मग मी माझा प्रीपेड बॅलंन्स दुसऱ्या आयडीया नंबरवर ट्रान्सफर करण्याची शक्कल शोधली आणि आता पुन्हा कागदपत्रके जमा न करण्याचा व माझा नंबर अनिच्छेने कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला.
एका दिवसाला फक्त तीन वेळा ५० रुपये असे १५० रुपयेच फक्त ट्रान्स्फर होवू शकतात. ते मी केले.
पण अजून बॅलन्स शिल्लक होता.
पण त्यांना हे कळले असावे, तर त्यांनी ४८ ऐवजी २४ तासातच सेवा बंद कली.
आता बोला!!
माझे सगळे उपाय करून झाले. ते आयडीयावाले जुमानले नाहीत.
म्हणजे बॅलन्स खाण्याचा हा प्रकार आहे. "

महत्त्वाची माहिती:
आयडीया टू आयडीया उरलेली बॅलन्स आपणांस दुसऱ्या आयडीया वर ट्रान्सफर करायचा असल्यास असा करा:
GIVE मोबाईल नंबर 50 असा एसएमएस करा ५५५६७ वर.
तीन वेळा.

अशा मुळे खालील प्रश्न मनात येतातः
ही कागदपत्रके सेंटरच्या कर्मचाऱ्यांकडून गहाळ होत आहेत का?
विविध सेंटर मधून ती कंपनीच्या मेन ऑफिसमध्ये पोहोचतच नाहीत का?
नाहीतर पोहोचल्यावरही ते हेतुपूर्वक त्रास देतात का?
तसे असेल तर त्रास देण्यामागचा हेतू काय?
मोबाईल मध्ये खुप बॅलन्स शिल्लक असेल आणि त्या ग्राहका कडून तो संपत नसेल तर मुद्दाम बॅलंस खाण्यासाठी तर ते असे ते करत नसावेत ना?
कुठे जातात ही न पोहोचलेली किंवा "अपूर्ण" कागदपत्रके?

"एक संशय असाही येतोय की ऑडीट मध्ये दाखवण्यासाठी त्यांच्याकडे ज्या मोबाईलधारकांची कागदपत्रके नाहीत, त्यांच्या साठी सुद्धा ते लोक आपलीच परत परत मागवलेली कागदपत्रके वापरत असतील?
म्हणजे, आपल्याच तीन चार वेळा दिलेल्या त्याच त्याच कागद पत्रांचा उपयोग वेगवेगळया नंबरसाठी तर ते वापरत नाही ना?
तसे असेल तर हा खुपच गंभीर विषय आहे.
हे कुठेतरी थांबले पाहिजे."

 - निमिष सोनार, पुणे