रताळी १/२ तास पाण्यात भिजवून ठेवावी, म्हणजे त्याला लागलेली माती पाण्यात विरघळून जाईल. परत एकदा रताळी स्वच्छ दुहून व नंतर पुसून घ्यावी. (रताळ्याचे काप आपण सालासकट करणार आहोत, म्हणून येवढे सोपस्कार... ) नंतर बट्याट्याच्या काचऱ्या करताना जशे बटाटे कापतो तशी रताळी कापून घ्यावी, गोल- गोल आणि साला सकट.
मध्यम आचेवर एका कढई मध्ये पाव वाटी तूप घेऊन, त्यात ४-५ लवंगा घालाव्या. मग रताळ्याचे काप घालून रताळी छान परतावी. रताळी एकसारखी ५/१० मिनिटे छान परतत राहावे. रताळ्याचा रंग पांढऱ्याचा हलका पिवळा होईल. त्यावेळेस समजावे की रताळी शिजली, आता त्यामध्ये १/४ साखर पेरावी व वेलदोडेपुड घालावी. ५ मिनिटे मंद आचेवर हळुवार हालवावी. (हे लक्षात ठेवा की रताळी आता शिजलेली आहेत, भसाभसा हलवली तर ती तुटतील, आणि आपल्याला रताळ्याचे गोल-गोल काप - न तुटलेले हवे आहेत.. )
वा!! मस्त रताळ्याचे काप तयार आहेत.
आई म्हणते जेव्हा आपण एखादा तूप घालून - गोड पदार्थ बनवत असतो त्यावेळी तूप गरम करत असताना ४/५ लवंगा टाकल्या तर त्या गोड पदार्थाला हलकेच आणि कळत-नकळत तिखटपणा येतो, ज्यामुळे गोड पदार्थाचा स्वाद अजून वाढतो.
उपासाच्या दिवशीची स्पेशल स्वीटडिश.
उपास अस म्हणून-म्हणून आपण जास्तच खातो का??? ह्याला खरंतर मग उपास न म्हणता Change Of Taste/ चवबदलं म्हणता येईल, पण मराठीमध्ये ह्याला अजुन अचुक काय म्हणता येईल बरं ???
आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.