प्रथम तुरीची डाळ शिजवुन घ्या. नंतर तेलामधे राई, जिरे, हिंग, हळद व वाटलेले खोबरे आणि लसुण घालुन शिजलेली डाळ जरा घोटुन घेउन फोडणीत घालावी. मग त्यात पाणी घालुन चिंचेचा कोळ , गुळ, मसाला, मीठ घालावे, चांगली उकळी आली की त्यात मळलेल्या कणकीच्या पोळ्या लाटुन घेउन शंकरपाळ्याच्या आकारचे तुकडे करुन घालावेत. चांगले शिजले की सर्व्ह करावे.
ह्या मध्ये वरून भर्पुर साजुक तुप घालून खावे.
ह्या सोबत भाजलेला पापड छान लागतो.
आईकडून
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.