आजचा सवाल- '?'

मानव जेव्हा आदिम अवस्थेतून पुढे सरकला, त्या काळात धर्म कल्पना बाल्यावस्थेत होत्या, पुरुष प्रकृती यांच्या मिलनातून सृष्टी घडली... हा सामान्यतः भारतीय पौरुषी धर्मांचा पाया आहे. ही कल्पना कमी अधिक फरकाने सगळीकडे आलेली आहे. याच कल्पनेला आधारभूत मानून पुढचा पुरुष/प्रकृती यांचा आजचा सवाल-जबाब लिहिला आहे...
पु-मरणं येऊ दे याचे तेव्हा, काशास चिंता आज करू?
बेधुंदीचा जीवन प्याला, का जहराने उगा भरू?.... गं गं गं गंऽऽ माझे बाई..!
प्र-धाडस ठायी असेल भारी, सावध चित्ता जरा करा
बेधुंदीही मरण दाविते, तिथे मनाला अवर जरा... रं रं रं रंऽऽ माझ्या राजा..!
पु-इष्कही आहे काव्यही आहे, सृष्टी सारी बेहोषी
का थांबू मी जीवन म्हणते, नाते आहे धुंदीशी...
प्र-सैरभैरही नकोस धावू, जात तुझी पाचोळ्याची
वादळ/वारा उधळून लावी, काय कल्पना साऱ्याची...
पु येडी म्हणू की खुळी म्हणू गंऽऽ, ओळख नाही माझी तुला
जीवन मी अन मरणही मी गं, नकोस समजू खुळं मला...
प्र-दमले बाबा तुझ्या समोरी, अक्कल शिकवू कशी तुला?
कल्पनाच त्या साऱ्या असती, नकोच झुलवू शब्द झुला...
पु-अगं शब्दांचा हा खेळच सारा, कुठे शब्द अन कुठे झुला?
नाते जडते शब्दांनीही, समजून घे रे सोनफुला....
प्र-(रागाने) अरे, भूल टाकूनी माझ्यावरती, तुझी हुशारी दावू नको..
उत्तर दे मग या प्रश्नाचे, तसाच पळुनी जाऊ नको...
प्र- जीवन मृत्यू असशील तूही, पहिले यातील काय असे..?
उत्तर दे रे विचार करुनी, ना जमले तर तुझे हसे....
पु-अंगं मेलाऽऽ जीव नि गेला मातीत, मिसळून तुझीया कायेशी
तुझ्याच मधुनी संचय पहिला, मृत्यूच असतो अविनाशी...
०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=