मनं पाखरू - पाखरू गेलं गगनाच्याही वरू
मनं पिसाट - पिसाट धावे जणू वेडे वारू
मनं उचंबळे कधी सागराच्या लाटेगत
क्ष्णार्धात घेते उडी खोल अद्बभूत दरीत
कधी आनंद वनात, कधी दुःखाच्या खाईत
खेळी सुर-पारंब्या कधी वनात फुलत
वाटे मनं भरलं-भरलं , रिक्त होतं क्षणातं
भेदरतं कधी मनं पडत्या पर्णला
कधी घाली गवसणी त्रिभुवनाला
जे न कधी घडे सत्यात- स्वप्नात
कल्पाना असंख्य दडल्या तयात
मनाची कवाडे जेव्हा मोकळी होतात
अर्थ शब्दांना लाभून कविता फुलतात
मनं उमजलं वाटे , निसटलं क्षणात
मावेला का कधी माझ्या दोन्ही करांत ?
खेळ खेळी सदा जागेपणी अन् नीद्रेत
वाट करी मोकळी स्वप्नांच्या जगात
मनाचा ठाव कोणा कधी का लागला?
घातलेले जणू कोडे आखिल मानवाला.