संगत

ना कधी भेटले कोणी 

ना कधी हासले कोणी 
पण रस्ता बदलला नाही 
आजवरच्या जीवनात मी
जे कधी संगतीत होते
आज त्यांचे सरकले मुखवटे
आतल्या चेहऱ्यात त्यांच्या 
खोल उदासी अन दुःख होते
चुचकारूनी त्यांना तरीही 
आसरा दिला घरीही
सोडताना मात्र त्यांच्या 
हृदयात गलबलले नाही 
एकटाच आहे जरी मी 
हासणे रडणे माझे स्वतःचे 
आज त्याचे झाले गाणे
झाली भैरवी , नाही रडगाणे