" बाबा मी वंदिले"
सांगा बाबासाहेब आमचे काय चुकले ।ध्रु॥
सवर्णात जन्म घेतला हेच का आम्हा नडले॥
स्वातंत्र्याची घटना आपण लिहिली ।
त्याची साऱ्या भारतभर वाहवा झाली॥
पण जातीच्या तिठ्याचे कोडे अद्याप नाहीसुटले॥१॥
आपण फक्त मागासलेल्यांना वर आणले।
त्यांना मागे अनेक वर्षे सवर्णांनी छळले॥
संपल्या त्या साऱ्या पिढ्या, आम्हा का हो गांजले॥२॥
एका जातीच्या मतासाठी राजकारणी सदा झटले।
त्यांना मागासले ठेवून स्वतः मात्र गब्बर झाले ॥
समाजात आता विषमतेचे बीज त्यांनीच पेरले॥३॥
आता एकच आशा बाबा आहे आमुचे उरी।
घ्या अवतार पुन्हा तुम्ही , तरच कमी होईल विषमतेची दरी॥
सारे भारतीय आता वाट पाहत येथे बसले॥४॥
अनंत खोंडे.
१४\४\२०१८ पुणे.