दुरुनीच बघणे उरे फक्त हाती
समोरून गेल्या सुखाच्या वराती
किती धूळ बसली इथे काळजावर
किती गाडली आत गेलीत नाती
कधी त्रिभुवनी मुक्त संचार होता
अता कोपऱ्या-कोपऱ्यावर जकाती
विनाशर्त प्रीती विनाअट जिव्हाळा
कधीच्याच ह्या नष्ट झाल्यात जमाती
म्हणा धर्मशाळाच माझ्या घराला
न थांबे कुणी फक्त येती न जाती
रित्या ना भले राहिल्या ओंजळी पण
अपेक्षात आम्हीच केल्या कपाती
....
(जयन्ता५२)