हरबरा डाळ ७-८ तास भिजत घालणे. डाळीतले सर्व पाणी काढून टाकणे. नंतर डाळ भरड वाटणे. डाळ वाटतानाच त्यात २-३ मिरच्या घालाव्यात, म्हणजे तिखटपणा सर्व डाळीला सारखा मिसळला जाईल. नंतर त्यात अर्धी कैरी किसून घालणे. चवीप्रमाणे कैरीचे प्रमाण कमी-जास्त करण्यास हरकत नाही. नंतर वरून फोडणी घालणे. चवीपुरते मीठ, अर्धा चमचा साखर, व चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ घालून हे सर्व मिश्रण चमच्याने एकसारखे करणे. झाली आंबेडाळ तयार.
रोहिणी
नाहीत.
सौ आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.