ग्रेस

शब्दांनी हरवुनी जावे ,क्षितिजांची मिट्ता ओळ,


मी सांज फुलांची वेळ.


व्रुक्षांच्या कलत्या छाया,पाण्यावर चन्द्र फुलांची,


मी निळीसावळी वेल.


गात्रांचे शिल्प निराळे,स्पर्शाचा तुट्ला गजरा,


मी गतजन्मीची भुल.


तु बावरलेला वारा, पायात धुळिचे लोळ,


मी भातुकलिचा खेळ.