पुन्हा शिवसेना

शिवसेनेने मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना झाली म्हणून दंगली सुरू केल्या आहेत. त्यामुळे लोकांचे अपार नुकसान होते आहे. अमक्या दिवसात गुन्हेगारांना पकडले नाही तर आम्ही आमच्या पध्दतीने प्रश्न सोडवू अशी धमकी ठाकऱ्यांनी दिली आहे. एका पुतळ्याकरता लाखो जिवंत लोक वेठीस धरले जात आहेत.
     शिवसेनेची सद्दी संपत आल्याने काही बाही उकरुन काढायचे काम चालू झाले आहे. नुकत्याच घडलेल्या भिवंडी दंगलीशीही ह्याचा संबंध लावला जातो आहे. त्या आगीवर आपली पोळी भाजा.
  पुतळा विटंबना शिवसेनेनेच घडवून आणली असावी असा संशय येतो.