१ हिरवी मिरची ,थोडेसे आले ,कोथिंबीर,ओले खोबरे,लिंबू.
तेल ,मोहरी , हिंग , हळद, कडीपत्ता ,मीठ,लाल तिखट.
१५ मिनिटे
४ जण
चण्याची डाळ रात्रभर( अथवा ६-७ तास) भिजत घालावी. यानंतर डाळ मिक्सरवर वाटून घ्यावी(वाटताना जास्त पाणी घालू नये.)
कढईत तेल घालून फ़ोडणी करावी.यात बारीक चिरलेली हिरवी मिरची , खिसलेले आले ,मीठ व तिखट घालावे.
यामध्ये वाटलेली डाळ घालून ती शिजवून घ्यावी.डाळ शक्य तितकी मोकळी झाली पाहिजे.
यावर चवीप्रमाणे लिंबू पिळावे.वरून कोथिंबीर व ओले खोबरे घालावे.
**नेहमीच्या तेलाच्या प्रमाणाहून थोडे जास्त तेल लागते . **
आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.