सर्वात आधी वऱ्याचे तांदुळ धुवून घेणे आपण भाताला धुवून घेतो तसे. साजुक तूपामध्ये जिरे, मिरचीचे तुकडे, व वऱ्याचे तांदुळ घालून थोडे परतणे मध्यम आचेवर. नंतर त्यामध्ये ३ वाट्या पाणी घालून शिजवणे. थोडे शिजत आले की त्यात कोथिंबीर, नारळ, दाण्याचे कूट, चवीपुरते मीठ व अजून २ वाट्या पाणी घालून सर्व मिश्रण कालथ्याने ढवळणे. पाणी आटत आले की गॅस मंद करून झाकण ठेवणे. १० मिनिटांनी गॅस बंद करणे.
वऱ्याचे तांदुळ लवकर शिजतात, पण गार झाले की खूप घट्ट होतात म्हणून जास्त पाणी घालावे लागते.
रोहिणी
वऱ्याचे तांदुळ पाणी जास्त घालून केले की नुसते पण खायला छान लागतात. दाण्याची आमटी केली नाही तरी चालते. उपासाला खातात. काहीजण याला भगर म्हणतात.
सौ पारखीवहिनी
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.