बटाटे साले काढून मोठे तुकडे करुन घेणे,कांदे,टोमॅटोचे ही मोठे तुकडे करणे.
तेल गरम करणे,त्यात हिंग घालणे.हळद घालणे.बटाट्याचे तुकडे घालणे.थोडे आले किसून घालणे,धने पावडर घालणे,हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालणे,मीठ घालणे,पाउण कप पाणी घालणे. झाकण ठेऊन मंद आचेवर ठेवणे. जेव्हा बटाटे अर्धे शिजतील तेव्हा कांदे व टोमॅटो घालणे व परत झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवत ठेवणे.पूर्ण एकजीव व्हायला हवे.
वरून कोथिंबीर घालणे.
बनारस च्या बाजूला अशा प्रकारची भाजी करतात.
वेगळी चव चांगली वाटते.
बटाटा , कांदा, टोमॅटो यांचे मोठ्ठे तुकडे करावे नाहीतर लगदा होतो.एका बटाट्याच्या ४ फोडी.तर कांदा व टोमॅटोचे ही मोठे तुकडे करावे.
आपण नेहमी तेलावर आधी कांदा टाकतो,मग इतर भाज्या..पण सुधा मौसी च्या पध्दतीत उलट आहे.
सुधा मौसी-दिनेश च्या सहकाऱ्याची मावशी
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.