बाप

बाप


आई घराचं मंगल्य असते, तर बाप घराचं अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वाला खारंच आम्ही कधी समजून घेतलेल आहे क? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त लिहीलं जात नाही; बोललं जात नाही. कोनताही व्याख्याता आईविषयी बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचच महत्व सांगीतलेल आहे, देवधीकांनी आईचेच ग़ायले  आहेत.लेखकांनी, कवींनी आईचं तोडंभरुन कौतुक केलं आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते, पण बापाविषयी कुठेच फारसं बोललं जात नाही. काहीं लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करनाराच. समाजात एक दोन टक्के असे बाप असतीलही पण चांगल्या वडिलांनबद्दल काय?


आईकडे अक्ष्रुचे पाट असतात पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं आणि रडनाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो कारण ज्योतीपेष्या समईचं जास्त तापते ना! पण क्ष्रेय नेहमीच ज्योतीलाच मिलत राहतं! रोजच्या जेवनाची सोय करनारी आई आमच्या लक्षात राहते पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करनारा बाप आम्ही सहज विसरुन जातो. सर्वांसंमोर आई मोकलेपणाने रडू शकते, पण रात्रि उशित तोंड खुपसून मुसमुसतो तो बाप असतो. आई रडते, पण वडिलांना रडता येत नाही. स्वतःच्या बाप वारला तरीही त्याला रडता येत नाही, कारण छोट्या भावंडाना जपायचं असत. आई गेली तरीही रडता येत नाही, कारण बहिनींचा आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावरच साथ सोडुन गेली तर पोरांसाठी अक्ष्रुंना आंवर घालावा लागतो.


जिजाबाईनीं शिवाजी घडवीला असं अवश्यं म्हनावं पण त्याचवेळी शहाजी राजांची ओटाताण सुद्धा ध्यानात घ्यावी. देवकीचं यशोदेचं कौतुक आवश्यं करावं पण पुरातून पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात ठेवावा. राम  हा कौसलेचा पुत्र अवश्य असेल पण पुत्र विभोगने तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता.


वडिलांनच्या  टाचा झिजलेल्या चपलांकडे बघितलं कि त्यांचे प्रेम कळते. त्यांचे फाटके बनीयन बघीतले कीं कळतं, " आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनीयनला पडलीत". त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला गाऊन घेतील, मुलाला शर्ट  घेतील पण स्वत: मात्र जुनी प्यांन्ट्च वापरतील. मुलगा सलुनमध्ये वीस पंचवीस रुपये खर्च करतो, मुलगी पार्लरमध्ये खर्च करते पण त्याच घरतला बाप दाढीचा साबन संपला म्हणून आंघोळीच्या साबनाने दाढी करतो. बाप आजारी पडला तरी लगेच दवाखान्यात जात नाही, तो आजाराला घाबरत नाही पण डाक्टर  एखादा महीना आराम करायला  लावतील    याची त्याला  भीती वाटते कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं, घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसते तरिही मुलाला मेडिकल, इंजिनिअरींगला प्रवेश मिळऊन दिला जातो, ओढातान सहन करुन मुलाला दरमहीन्याला पैसे पाठवले जातात. पण सर्वच नसली तरी काही मुलं अशीही असतात की जे तखेला पैसे येताच मित्रानां परमीट रुममध्ये पार्ट्या देतात आणी ज्या बापानी पैसे पाठवीले त्याच बापाची टिंगल करतात. एकमेकांच्या बापाच्या नावांनी एकमेकाला हाका मारतात.


आई घराचं मंगल्य असते, तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेनं कोणीही बघु शकत नही. कारण घरातला कर्ता जिवंत असतो, तो जरी कहीही करत नसला तरीही तो त्या पदावर असतो आणि घरच्यांच कर्म बघत असतो, साभाळत असतो.


कोण्त्याही परीक्षेचा निकाल लगलयावर आई जवळची  वाटते कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचुप जाऊन पेढ्यांचा पुडा आणनारा बाप कोनाच्याच लक्षात राहत नाही. आजारातील आईची माया खुप आठ्वते  पण हॉस्पिट्लच्या आवारात आणि औषधीच्यां दुकानात अस्वस्थपणे वावरणारया बापाची कोनीही दखल घेत नाही.


चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला तर "आई ग! " हा शब्द बाहेर पडतो, पण रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो तेव्हा "बाप रे!" हाच शब्द बाहेर पडतो. छोट्या संकटासठी आईचालते पण मोठ्मोठी वादळ पेलताना बापच आठवतो.  काय पट्तय ना?


कोनत्याही मंगलप्रसंगी घरतील सर्वजण जातात. पण मयताच्या प्रसंगी बापालाच जावे लगतं. कोणताही बाप क्षिमंत मुलिच्या घरी जात नसतो. पण गरीब लेकिच्या घरी उभ्या उभ्या का होयिना चक्कर मारतो. तरुण मुलगा ऊशीरा घरी येतो तेव्हा बाप जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांसमोर लाचार होनारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणरा बाप, घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपनारा बाप......खरच, किती ग्रेट असतोना?


वडिलंच महत्त्व कोनाला कळतं? लहनपनी वडीलगेल्यावर अनेक जबाबदारया खुप लवकर पेलाव्या लागतात, त्यांना एकेका वस्तुसाठी तरसावं लागत. वडिलांना खरया अर्थाने समजुन घेते ती म्हनजे त्या घरतील मुलगी सासरी गेलेल्या अथवा घरापासुण दूर असलेल्या बापाशी बोलताना बापाच बदललेला आवाज एका क्षणात कलतो, ती अनेक प्रश्न विचा.रते कोनतिहि मुलगी स्वातःच्या इच्छा बाजुला ठेऊन बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या बोहल्यावर चठते, ती मुलगी बापाला जाणते,  जपते. इतरांनी सुद्धा असचं आपल्याला जाणावं हीच बापाची कीमान अपेक्षा असते.


 


हा लेख... मझा नही... मला ईमेल नी मिळाला.....


त्या लेखकाचे आभार करण्यासाठी मी त्याला मनोगत वर लिहिला


लिखानात टायपिंग आणी व्याकरणाच्या फार चुका असतील त्यासाठी मला क्षमा करा.