पटकन संपणारी इंडियाची मॅच
नकोशी वाटायला लागते,
जेंव्हा
अवसानघातकीपणाचीच सवय करुन दिलेली असते
मग जिंकत आलो असलो तरी,
विकेट ज़ावीशी वाटते,
आणि
सचिनची विकेटसुद्धा देउन जाते एक अघोरी आनंद...
चला, बरं झालं लेकाचे हरले
आता निदान वर्ल्डकप पर्यंत काळजी नाही काहीच,
शिव्या घालायला आहे काहीतरी कारण आता.
प्रेरणा: कारण