२ कप दूध+ साधारण १ कप दूध, वेलची,जायफळ स्वादासाठी, बदाम
घावनासाठी: २ वाट्या तांदूळाचे पीठ+ चवीपुरते मीठ
४५ मिनिटे
२ जणांना
घाटले: कणिक तूपावर गुलाबी रंगावर भाजून घ्या,त्यावर खोबरे घालून थोडे अजून भाजा,गूळ घाला आणि थोडे भाजा,दूध घालून चांगले शिजवा.शिजल्यावर त्यात बदाम,वेलची,जायफळ घाला व ढवळा. हे घाटले तयार झाले.यातील दूध लवकर आळते आणि मिश्रण घट्ट होते ,त्यामुळे वाढायच्या आधी १/२ ते १ कप दूध घाला व खिरीसारखे सरसरीत मिश्रण करा.दूध घातल्याने अगोड वाटल्यास थोडी साखर/गूळ घाला.(परंतु गूळ चटकन विरघळत नाही.)
घावने: तांदळाची पिठी पाणी व चवीपुरते मीठ घालून घावनाला/धिरड्यांना भिजवतो तसे भिजवा,१०/१५ मिनिटे ठेवा.तवा चांगला तापवून घावने घाला.घाटल्याबरोबर खा.
गणपतीगौरी आले की गौरीजेवणाला कोकणास्थांकडे घावन घाटले असते.
सौ.आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.