सगळ्यात आधी तांदूळ धुऊन तो कमी पाणी घालून शिजवून घ्यावा, पाणी कमी घातल्याने भात फडफडीत होईल. भात करून घ्यावा.
भात जरा थंड झाला की हाताने तो मोकळा करावा.
नंतर पातेल्यात तेल गरम करायला ठेवावे, त्यात आधी मोहोरी टाकवी, मोहोरी तडतडल्यावर त्यात जिरे घालवे. मग २-४ लाल मिरच्या घालाव्या.
आधी शेंगदाणे परतून घ्यावेत आणी मग काजू टाकावेत. आवडत असल्यास थोडा लसूण बारीक करून घालवा.
मग दोन्ही डाळी टाकाव्यात,मस्त खमंग परतून घ्यावे,नंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात आणी हळद पण टाकावी.
जरा परतून जाले की लिंबाचा रस टाकावा, जर जास्त आंबट चालत असेल तर जस्त टाकावा.पण फार आंबट होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
आणी जरा वेळ ते सगळे असेच परतू द्यावे,त्यामुळे लिंबाचा आंबटपणा मुरतो,
आणि सगळ्यात शेवटी भात टाकावा,आणी हवी असेल तर साखर टाकावी,पण खरे ह्यात साखर टाकत नाहीत,कोथिंबीर बारीक चिरून टाकावी.थोडा वेळ परतू द्यावे.
हा भात नुसता खायला देखिल चांगला लागतो....आणी करायला वेळ पण कमी लागतो.
साखर आणि लसुण आवडत असल्यास घालावे. नाही घातले तरी चालतात.
मैत्रिण
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.