सरदारजीचे पत्र

एका सरदारजीने आपल्या नातेवाईकाला पत्र लिहिले आणि चूकीने  To च्या जागी त्याच्या नातेवाईकाच्या नाव आणि पत्याच्या एवजी स्वतःचा नाव आणि पत्ता लिहिला. आणि From च्या जागी स्वत:चे नाव आणि पत्याच्या एवजी त्याच्या नातेवाईकाचे  नाव  आणि पत्ता लिहिला. पहिल्या डाकेने पत्र गेले पाहिजे म्हणून सकाळीच पोस्टाच्या पेटीत नेवून टाकले. दूपारी तेच पत्र घेवून पोस्टमन सरदारजीच्या घरी पोहोचला. पत्र घेवून सरदारजीने आलटून पालटून बघितले आणि पोस्टमनला म्हणाला " वा वा भाई कमाल होगया... तुमचं पोस्ट डीपार्टमेंट केव्हापासून एवढं प्रॉम्प्ट झालं .. सकाळी पत्र पाठवलं आणि दुपारी उत्तर पण आलं "