-सर्वप्रथम पनीर चे तुकडे तळून घ्यावे. -एका पॅन मधे लोणी घ्यावे आणि गरम झाले की वाटलेला कांदा घालावा. -कांदा चांगला परतून घ्यावा (बाजुनी लोणी सुटेपर्यंत) आणि आले लसूण पेस्ट घालावी. ते ही परतून घ्यावे. -नंतर हळद, तिखट, धन्याची पूड, गरम मसाला, टोमॅटो प्युरी, काजूची पेस्ट घालावे आणि ७-८ मिनिटं परतावे.(काजू पेस्ट शिजेपर्यंत) -ग्रेवी किती दाट हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालावे. -तळलेले पनीर चे तुकडे घालून एक उकळी आणावी. - क्रीम घालून गॅस बंद करावा. -कोथिंबीर घालून फुलके, पराठे किंवा नान सोबत खाण्यास द्यावे.
- पेस्ट बनवण्या आधी काजू अर्धा तास पाण्यात भिजत घालावे. - वाटताना हवे तसे पाणी घालून मऊ पेस्ट बनवावी.(शक्यतो कमीच पाणी वापरावे).
स्वप्रयोग
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.