मंडळी,
एक विचार सर्व कवींच्या प्रतिभेला वंदन करुन
मनोगत वर बरेच कवी आणि कवयित्री प्रतिभाशाली काव्य प्रकाशित करत आहेत.
मुळ कविता वाचून होते न होते तोपर्यंत त्याचे विडंबन काव्याचा घाणा तयाऱच असतो.
माझे वैयक्तिक मत असे आहे की वाचकांना मुळ कविता वाचण्यास वेळ द्यावा. प्रत्येक व्यवसायाच्या स्वतःच्या घटना असतात. त्याप्रमाणे इतर कवितांचा आदर ठेवला जावा एवढीच अपेक्षा. (उदाहरणार्थ किमान १ - २ आठवड्यानंतर विडंबन आले तर कसे?)
यावर नाराज होणाऱ्या वाचकांची आधीच क्षमा मागून टाकतो, पण कवी आणि कवयित्री यांचा विचार जाणून घेण्यास उत्सुक आहे.
विनम्र