आदल्या रात्री, भरपूर पाण्यात, आख्खे उडीद आणि राजमा एकत्र भिजत घाला.
दुसर्या दिवशी सकाळी...
आलं आणि लसूण वेगवेगळे, अगदी बारीक चॉप करून घ्या.
कांदा, कोथिंबीर बारीक चिरून ठेवा.
भिजवलेले उडीद आणि राजम्यातले पाणी टाकून द्या. दोन्ही कडधान्ये हलक्या हाताने धूऊन, चॉप केलेल्या आल्यातील अर्धे आले घालून, ताज्या पाण्यात शिजवायला ठेवा. सोडा वगैरे टाकण्याची गरज नाही. कडधान्ये पूर्ण शिजली की जास्तीचे पाणी टाकून द्या.
एका पातेल्यात तेल आणि बटर मंद गॅस वर गरम करा. (बटर जळता कामा नाही.) तेल-बटर नीट तापले की त्यात जिरे टाका. जिरे तडतडले की उरलेले, चॉप केलेले, अर्धे आले आणि लसूण टाकून परतून घ्या. लसणाचा छान सुगंध आला की कांदा टाकून परतून घ्या. कांदा गुलाबी रंगावर परतला की उडीद, राजमा, तिखट, गरम मसाला आणि मीठ टाकून नीट मिसळून घ्या. गरजे पुरते पाणी टाका. (अंतिम पदार्थ जरा दाटसरच असावा). दाल-माखनी उकळली की क्रिम फेटून त्यात मिसळा. रस दाटसर झाला की खाली उतरवा. (गॅस बंद करा).
दाल-माखनी काचेच्या वाडग्यात काढून त्यावर कोथिंबीर भुरभुरून जेवणाच्या टेबलावर घ्या.
शुभेच्छा..!
दाल-माखनी, गरम-गरम परोठयां बरोबर अथवा लांब शीतांच्या, सुगंधी, बासमती तांदळाच्या पांढर्या शुभ्र भाताबरोबर अत्यंत चवीष्ट लागते. (लोणच्याची फोड विसरू नका). जेवणानंतर, कमीत कमी एक तास, कुठलाही आवाज येणार नाही अशा शांत आणि थंड वातावरणात, झो ऽ ऽ प मात्र हवी.
संजीव कपूर's - खाना खजाना
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.