तरं !

दुवा क्र. १

वरील दुव्याबद्दलची बातमी आज एका चॅनलवर होती. ह्या लेखात बिहारींनी मुंबईतून पळून न येता तिथेच प्रतिकार करायला हवा होता वगैरेची भाषा केली आहे. वर कहर म्हणजे, राज ठाकरेंवर प्रत्येक घरातून निदान एक तरी कोर्टकेस दाखल करण्याचाही सल्ला दिला आहे.

आजच बिहारचे सर्वदलीय मंत्री राजच्या विरोधात पंतप्रधानांना भेटणार आहेत. एक बिहारी  युवक ( हो .. तो बिहारी आहे, म्हणजे तो गुंड नसणारचं मग तो बंदूक घेऊन लोकांना मारण्याची धमकी देत बसमध्ये फिरला तर काय झालं ? )"महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच" बसचे अपहरण करण्याचा प्रयत्न करतो. नितिशकुमार .. त्याचाही बचाव करतात !

आजवर आपल्या माणसांच्या मागे आपणही नेहमी असेच उभे राहिलो असतो तरं ... राज ठाकरे आणि बाळ ठाकरेंची गरज लागली असती का ?

मयुरेश वैद्य !