लालकृष्ण आडवाणी - पंतप्रधान पदासाठी

नमस्कार,

मागच्या १२ वर्षात आपण दोन्ही [भाजपा व कॉग्रेस] पक्षांची सरकार अनूभवलीत. इतक्यात जगामध्ये बरेच बदल झालेत. जसे की तालीबान ची ताकद वाढतच गेली, अमेरिकेत एक अश्वेत राष्ट्रपती निवडून आला वगैरे. पाकिस्तान कडे आज भारतापेक्षा जास्ती प्रकारच्या मिसाईल्स आहेत... आश्चर्य! आपल्याला त्या बनवायला अजून २०१२ ची वाट पाहावी लागणार आहे. त्यांना त्या अमेरिके कडून व चीन कडून तश्याच मिळतात.

भारतावर अजून किती हल्ले होवू दिल्यावर भारत पलटवार करेल? शहीदांच्या घरच्यांनी पदक परत केलीत, पण अफजल सुरक्षीत आहे. तसाच कसबही.

महागाई, बेकारी व शेतकर्यांच्या आत्महत्या थांबतच नाही आहेत.

वरतून एक मोठी गोष्ट - तुम्ही मुसलमान, क्रिश्चन किंवा काही जातीचे असाल [थोडक्यात हिंदू नसाल] तर सवलतीच सवलती. प्रत्येकासाठी कायदा वेगळा. सेक्यूलर आहोत ना आपण सगळे.

मला तरी वाटत आहे की फक्त लालक्रुष्ण आडवाणी आता भारताला सावरू शकतात. तुमचे काय मत आहे?

आपण सगळ्यांनी ह्या वेळेस एका जवाबदार भारतीय प्रमाणे मतदानास जाणे जरूरी आहे [मत कोणाला द्यायचे हा प्रत्येकाचा वैयतीक प्रश्न आहे]. जागोरे डॉट कॉम ह्या साठी ऊत्तम मोहीम चालवत आहे. प्रत्येकास विनंती आहे की ह्या बाबत जाग्रूकता पसरवावी.

अमोल