नमस्कार,
लवकरच भारताचे नागरिक नवीन सरकार नेमून देणार आहे. ह्या वेळेस भारताच्या निवडणूकेचा खर्च अमेरिकेत झालेल्या निवडणूकेपेक्षा जास्त राहणार आहे. अशा वेळेस प्रत्येक भारतीय नागरिकाची ही जवाबदारी बनते की त्याने मतदान करावे. कोणाला करायचे हे त्याला ठरवू देत.
मला इतक्यात एका नव्या कार्यक्रमाची माहिती मिळाली. मला वाटले की मी ती सगळ्यांसोबत वाटावी. नक्कीच ज्यांना ह्यात रुची आहे, त्यांना फायदा होईल. एक नवीन मंडळ अस्तीत्वात आले आहे जे की भारताताला नवीन दिशा देण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे व जे की बीजेपी च्या तत्त्वांवर आधारित आहे. आज भारताला पूढे जायचे असेल तर सरकार बदलण्याची सक्त गरज आहे.
ह्या मंडळाचे नाव आहे - फ़्रेन्ड्स ऑफ बीजेपी!
यूपीअए ला ५ वर्षा आधी बूमीन्ग इकॉनॉमी मिळाली होती, प्रत्येकानी खूप काही अपेक्षा केल्या होत्या. आज जर भारताची स्थिती पाहिली तर आपण प्रगतीची पायरी वरतून खालती चढतो आहे. शेतकरी असो, सैनीक असो, नागरिक असो प्रत्येक जण त्रस्त झाला आहे ह्या सध्याच्या सरकारामूळे. फक्त आपला वोट बैंक वाचवण्यासाठी भारताला कमजोर करणे, हा देशासोबत सगळ्यात मोठा देशद्रोह आहे. अफजल गुरुला फाशी देण्याचा विषय आला की त्याच्या पहिले राजीव गांधी चा खूनी रांगेत आहे - हे कारण सांगणे... काय स्रूरू आहे. त्या आतंकवाद्यांची ढाल बनणे किती महाग पडतय देशाला ह्याचा काही विचार करेल की नाही कोणि? तालीबान आज फक्त ५० कि. लो. दूर आहेत, काय करत आहोत आपण त्या बद्दल?
एक गोष्ट खरी की सध्याच्या सरकार च्या भरोस्यावर राहीलो तर भारताचा सोमालीया होणे लवकरच साध्य दिसतं आहे. लोकतंत्र म्हणजे एका परिवाराचे सदस्यच फक्त पंतप्रधान बनतील अस असेल, तर ते आज आपल्याला बदलावे लागणार आहे.
ज्यांना बीजेपी चे तत्त्व पसंत आहे, त्यांना माझे निमंत्रण आहे - टिचकी मारा - http://friendsofbjp.org/
यूट्यूब वर पण तुम्हाला काही छान विडीयो मिळतील - http://www.youtube.com/watch?v=V7ojmP9Dweg
जय हिंद - जय महाराष्ट्र