वृत्तपत्रांतील अग्रलेखांबाबत काही निरीक्षणे.

वृत्तपत्रात दररोज प्रसिध्द होणार्‍या अग्रलेखाबाबत काही निरीक्षणे येथे  लिहीत आहे. याला आपण छोटासा सर्वेक्षण अहवालही म्हणू शकता.

वृत्तपत्रातील अग्रलेख म्हणजे त्या त्या वृत्तपत्राच्या संपादकाने होऊन गेलेल्या बातमीवर अथवा होणार्‍या घडामोडींवर(निवडणूक,निवडणूकीचे निकाल,साहीत्य संमेलने,इ) केलेले परखड भाष्य. अनेक नवे जुने संदर्भ अग्रलेखात सामाविष्ठ असतात. वृत्तपत्रक्षेत्रात अग्रलेखाला असणारे महत्त्वाचे स्थान ल़क्षात घेऊन हा विषय येथे लिहावासा वाटला.
महत्त्व : वृत्तपत्रक्षेत्रात अग्रलेखाचे महत्त्वाचे स्थान अबाधीत आहे कोणतीही घटना घडल्यास(जास्त करून राजकीय) वाचक त्या त्या दिवशी म्हणजेच दुसर्‍या दिवशी या बाबत संपादकाचे मत काय असेल याबाबत खुप उत्सुक असतो. याचे कारण कोणतेही वृत्तपत्र हे अपवाद सोडून कोणत्या ना कोणत्या राजकीय विचारांना वाहीलेले असते अशी प्रत्येक वाचकाची ठाम धारणा असते. त्यामुळे कोणतेही वृत्तपत्र घ्या त्या वृत्तपत्रात अग्रलेख हा असतोच. काही वृत्तपत्रांचा खप हा अग्रलेखांमुळे होतो.यावरून अग्रलेखाचे वृत्तपत्रातील महत्त्व लक्षात येते. अग्रलेखाची व्याती खुप मोठी आहे. काही अग्रलेख हे समाजमनावर परीणाम करणारे असतात(उदाहरणार्थ कोणाच्या भावना दुखावणे वैगेरे)त्यातुनच मग त्या वृत्तपत्राच्या अंकांची होळी करणे , वृत्तपत्रकार्यालयावर हल्ला करणे,कधी कधी तर थेट संपदकालाच लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यातुनच मग त्या वृत्तपत्रावर खटले भरणे इ.प्रकार घडतात. अग्रलेखाला थेट संपादकच जबाबदार असतो.त्यामुळे अग्रलेख लिहीताना संपादकाला चहूबांजूनी विचार करावा लागतो. अग्रलेख लिहीताना त्यात अनेक नव्या जुन्या संदर्भांचा त्यात समावेश करावा लागतो.त्यासाठी संपादकही तेवढ्या ताकदीचा असावा लागतो.यावरूनच अग्रलेखाची व्याप्ती लक्षात येते.
बहुसंख्य वाचकांच्या मते अग्रलेखातील लेखन संपादक आपल्या सोईनुसार करतात.
त्याचे तीन प्रकारे वर्गिकरण करता येईल. १)राजकीय विचार २) तटस्थ भुमिका ३) प्रसिद्ध व्यक्तीस मानाचा पुरस्कार मिळाल्यास अथवा प्रसिध्द व्यक्ती मरण पावल्यास लिहीण्यात येणारे अग्रलेख.
१) राजकीय विचार- बहुसंख्य वृत्तपत्र हे ठराविक राजकीय विचारांना वाहीलेले असतात अस वाचकांचे ठाम मत असते. उदा.काही वृत्तपत्रे धर्मनिरपेक्ष,धार्मिकता,साम्यवाद यांनुसार चालतात अर्थात साम्यवादाला जवळ करणारी वृत्तपत्रे फार कमी आहेत अथवा नाहीत. राजकीय विचारांना वाहीलेले वृत्तपत्रे व त्यातील अग्रलेख यांचे वाचकांना फार आकर्षण असते. एखादी घटना घडल्यास दुसर्‍या दिवशीच्या संपादकीयांत काय लिहीले आहे याची वाचकांस उत्सुकता असते. त्यावरून मग वाचकांच्या विचारांची देवाण घेवाण होते.उदाहरणार्थ एखाधा वाचकाने धर्मनिरपेक्ष विचार मानणार्‍या वृत्तपत्रातील अग्रलेख वाचल्यास व दुसर्‍या वाचकाने धर्मांध विचार मानणारे वृत्तपत्र वाचल्यास आणि या दोन्ही वाचकांनी एकामेकांशी संवाद साधल्यास त्यांत आजच्या या वृत्तपत्राच्या अग्रलेखात अस अस लिहीलय त्यावरून मग चर्चा आणि त्यावरून अखेरीस आपापल्या राजकीय विचारांस चालना मिळण्यास मदत होते.
तसेच बर्‍याचदा वृत्तपत्रातील अग्रलेख आताआतापर्यंत ठराविक राजकीय विचारांवर चालणारे तसेच एखाद्या राजकीय विचारांना अथवा पक्षाला विरोध करणारे त्यांचे अग्रलेख अचानक त्यांच्या बाजूने लिहू लागतात.त्यांना वाचक संपादकाने राजकीय सोईनुसार बदललेली भुमिका असे म्हणतात किंवा कधी कधी एखादया पक्षाने (संपादक ज्यांचे विचार मानत नाही तो) चांगले काम केल्यास संपादक त्यांविषयी अभिनंदनपर अग्रलेख लिहीतो. त्यावेळी अस न वाचण्याची सवय असल्याने वाचकांस धक्का बसतो.

२) तटस्थ भुमिका - वृत्तपत्रातील अग्रलेख हे कधी कधी तटस्थ भुमिका घेताना आढळून येतात. एखादी राजकीय घटना अथवा केंद्र,राज्य सरकारचे बजेट असल्यास अग्रलेखात विरोधी भुमिका न घेता तटस्थ भुमिका घ्यावी लागते. कोणालाही विरोध न करणे वा त्या बाजुनेही न उभे राहणे यांमुळे अग्रलेखात आपली भुमिका चांगल्या प्रकारे माडता येते.तटस्थ भुमिकेतील अग्रलेख कोणावरही आगपाखड न करणारे,शिवराळ,एकतर्फी नसतात. या प्रकारच्या अग्रलेखामुळे वाचकांस विचार करण्यास अधिक वाव मिळतो.

३) प्रसिद्ध व्यक्तीस मानाचा पुरस्कार मिळाल्यास अथवा प्रसिध्द व्यक्ती मरण पावल्यास लिहीण्यात येणारे अग्रलेख - एखादा प्रसिध्द व्यक्तीस मानाचा पुरस्कार मिळाल्यास त्यांना वृत्तपत्राच्या प्रथम पानावर बातमी मिळतेच पण त्या व्यक्तिबाबत अग्रलेखात संपादक आपली मते मांडतो. आवश्यक संदर्भ देऊन त्या व्यक्तिस मिळालेला पुरस्कार कसा योग्य आहे किंवा नाही याबाबत शहानिशा अग्रलेखात केली जाते.पुरस्कार प्राप्त व्यक्तीची प्रशंसाही केली जाते.त्याचप्रमाणे एखादी प्रसिध्द व्यक्ती मरण पावल्यास शोकसंदेशपर अग्रलेख लिहीले जातात. त्या त्या व्यक्तीचे समाजजीवनातील स्थान,त्याचे कार्ये याबाबत अग्रलेखात लिहीले जातात. याबाबत एक सांगावेसे वाटते जुन्या जमान्यातील एखादी प्रसिध्द व्यक्ती मरण पावल्यास तिच्यावर गौरवपर अग्रलेख लिहून त्या व्यक्तीबाबत विस्तृत स्वरुपात माहीती लिहिली जाते.त्यामुळे वाचकांस त्या व्यक्तिबाबत माहीती मिळण्यास मदत होते.
अग्रलेख हे संपादकीय भुमिकेवर अवलंबून असतात.संपादक कोणत्या विचारांचा आहे त्यावर अग्रलेखात भुमिका मांडली जाते असे वाचकांचे मत असते. अग्रलेखात मांडलेली प्रत्येक भुमिका वाचकांस पटेलच असे नाही.वाचकांस न पटलेली अनेक मते वाचक वृत्तपत्र कचेरीत पत्रे पाठवून व्यक्त करत असतात.प्रत्येक वृत्तपत्रे - त्यातील अग्रलेख हे वृत्तपत्राचे महत्वाचे स्थान असते. संपादकाने दिलेले योग्य संदर्भ ,मांडलेली मते यांमुळे वाचकाचे ज्ञान वाढते त्याचप्रमाणे अग्रलेख हे प्रामुख्याने राजकीय घडामोडींना वाहीलेले असल्याने अश्या प्रकारच्या अग्रलेखांमुळे वाचकांची राजकीय मते बदलण्यास मदत होते.
त्याचप्रमाणे वाचकाच्या घरी येणारे वृत्तपत्र कोणत्याही एका नावाचे एकच येत असते.त्यात वाचक बदल करत नसतो.घरी येणारे वृत्तपत्र त्यांतील अग्रलेख वाचक दररोज वाचत असतात. यांखेरीज जर दुसर्‍या वृत्तपत्रात काही घटनांमुळे त्यातील अग्रलेख त्या दिवशी गाजत असेल तर वाचक कुतुहलापोटी ते वृत्तपत्र विकत अथवा एखाधा सहकार्‍या कडून घेतो.अग्रलेख हे राजकीय विषयाला वाहीलेले असल्यामुळे वाचकांना त्याची सवय जडलेली असते. कधीकधी आर्थिक ,सामाजिक,खेळ,इ. यांविषयावरील अग्रलेख प्रसिध्द होतात. तेव्हा असे अग्रलेख वाचताना वाचक कधीकधी कंटाळतात.
मराठी वृत्तपत्रांपैकी काही वृत्तपत्रात एकच अग्रलेख लिहीला जातो(उदा-दै.लोकसत्ता,दै.आपलं महानगर) तर काही वृत्तपत्रात दोन अग्रलेख लिहीले जातात (उदा-दै.प्रहार,दै.महाराष्ट्र टाईम्स)
आपला
कॉ.विकि