बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा नेहमी प्रमाणे चिराव्या.
गाजराचे उभे काप करावेत.. (अर्ध्या बोटाएवढे)
कढई ता नेमके पाणी घेऊन या सगळ्या भाज्या उकळायला ठेवाव्यात...
हिरव्या मिरच्या, जिरे, आलं, नारंळ . मीरे आणि चवीप्रमाणे मीठ यांची पेस्ट तयार करावी..
भाज्या उकळल्यावर, थोडे पाणी कढईत ठेवून बाकीचे(जास्त असल्यास) टाकून द्यावे..
तयार केलेली पेस्ट कढईत घालावी आणि २ मिनिटे हालवावे
दह्याचे ताक करावे आणि त्यात थोडीशी हळद घालावी.
हे ताक कढईत टाकावे..
वरून दोन ते तीन कढीपत्त्याची पाने घालावीत
२ चमचे साधे किंवा नारळाचे तेल घालावे.
२ मिनिटांनंतर आचे वरून काढावे..
अवियल हा मलयाली पदार्थ आहे.
गरम भाताबरोबर किंवा फुलक्याबरोबर या पदार्थाची गट्टी छान जमते.
यात तोंडली, वांगी, दुधी भोपळा अश्या अनेक भाज्या टाकता येतात.
वर लिहितांना मद्रास सुरण असे लिहिले आहे कारण दोन प्रकारचे सुरण महाराष्ट्रात मिळते. साध्या सुरणाला चिरून चिंचेच्या पाण्यात घालून ठेवतात घश्याला खाज येऊ नये म्हणुन...
आपण महाराष्ट्रातही कोहळ्याची, किंवा दुधीची दह्याची भाजी करतो.. पण वरून हिंग, मिरची, हळद अशी फोडणी घालतो..
तसाच हा पदार्थ आहे.. पण ह्यात असलेल्या हिरवी मिरची, आलं आणि जिऱ्याच्या स्वादाने ही भाजी चमचमीत लागते..
नारळाच्या तेलाने थोडासा केरळचा फील येतो..
इंटरनेट
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.