डाळी धुवून कोरड्या करून घ्या. तेल/ तूप गरम करून त्यात डाळी व काजू तुकडे तांबूस रंगावर परतून घ्या. त्यात मोहरी, जिरे घालून तडतडवा, कढीपत्ता, लाल मिरच्या व ताक क्रमाक्रमाने घाला. मीठ व धुवून ठेवलेला तांदूळ घालून मंद आंचेवर भात जरा मऊसर होईपर्यंत (थोडा जास्तच) शिजवा. वाढताना कोथिंबीर भुरभुरवा.
हवा असल्यास खवलेला नारळही वरून घालू शकता. अतिशय रुचकर, सौम्य व पचायला हलका पदार्थ. एकदम दाक्षिणात्य पद्धतीची चव!
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.