आजच्या वर्तमानपत्रात वाचलं की परदेशी विद्यापीठांना आता देशभरात स्वतःचे कँपस उभे करता यावे यासाठीच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे.
दुवा क्र. १
यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे... तुम्हाला काय वाटतं?
१. यामुळे आपल्या विद्यापीठांचा दर्जा वाढेल ?
२. आय टी क्षेत्राकडे जाणारे हुशार विद्यार्थी शिक्षणक्षेत्राकडे वळतील ?
३. परदेशी विद्यापीठांचा शिक्षणाचा दर्जा काय असेल ?
४. विद्यापीठ परदेशी असले तरी शिक्षक भारतीयच असतील, तर परदेशी विद्यापीठे भारतीय विद्यापीठांसारखी तर नाही ना होणार ?
या विधेयकाबद्दल अधिक माहिती, दुवे असल्यास द्यावे.
धन्यवाद.