मणीपुर

मणीपुर चा शब्दशः अर्थ होतो रत्नांची भुमी. भारताच्या संस्कृतीशी घट्ट नाळेने जोडलेला पण अगदी एकटा पडलेला हा भूप्रदेश. गेल्या दोन दशकापासून मात्र या भूभागावर बंडखोरीचे सावट पडून हा भूभाग झाकाळून गेला आहे. या दिशाभूल केल्या गेलेल्या चळवळी मागील कारणे काहीही असले तरी देशाच्या या रक्तरंजित भूभागामुळे देशाच्या जनतेला अस्वस्थ करून सोडले आहे.

२२३२७ चौ.  कि. मी. मध्ये विस्तारले असलेले हे राज्य डोंगराळ भाग व दऱ्यांचा सखल प्रदेश यात विभागलेले आहे. दर्यांचा सखल भाग हा केवळ २२३८ म्हणजे संपूर्ण राज्याच्या केवळ १०% इतका असला तरी राज्याची ५८. ८५% जनसंख्या या भागातच एकवटली आहे. याउलट डोंगराळ प्रदेशातील २००८९ चौ.  कि. भागात एकूण जनसंख्येच्या ४१. ५६% लोक राहतात. (२००१ ची आकडेवारी) स्थानिक जनजातींमध्ये मुख्यतः तीन गट आहेत. यात सर्वात मोठा गट हा मैतीयी या जनसंख्येचा असूनही त्यांना Non-Trible असे गणल्या जाते आणि ते मुख्यतः सखल भागात राहतात.. अन्य दोन जमाती म्हणजे नागा व कुकी. कुकी हा मीझो जमातीचा उपगट आहे. या दोनही जमाती त्यांच्या २९ उपजमातींसह डोंगराळ भागात राहतात. येथील मुस्लिम समाज हा स्वातंत्र्यापूर्वी पूर्व बंगालमधून व नंतर पूर्व पाकिस्तानातून व नंतरच्या काळात बांगलादेशातून स्थलांतरित झालेला असून त्यांना पंगाल असे म्हणतात. त्यांचे लोकसंख्येशी प्रमाण हे ८% असून ते देखील सखल प्रदेशात राहतात. याशिवाय देशाच्या विविध भागातून व्यवसायानिमित्त अथवा इतर काही कारणाने या राज्यात झालेले आहेत. ते देखील Non-Trible असून त्यांना मयांग म्हणजे बाहेरचे असे संबोधिले जात.
मैतियी  येथील मुळ निवासी असले तरी ते वैष्णव असल्यामुळे त्यांना Non-Trible समजून त्यांना घटनेने अनुसूचित जमातींना दिलेल्या विशेष  सवलतींपासून वंचित तर ठेवलेले आहेच पण त्यांना राज्याच्या जमीन सुधारणाकायदा अंतर्गत डोंगराळ भागात स्थायिक होण्यास प्रतिबंध आहे. मात्र नागा व कुकी जे बहुतांश ख्रिश्चन आहेत. त्यांना या भागात स्थायिक होण्यास कुठलेही निर्बंध नाहीत. मैतिया विरुद्ध नागा कुकी यांयामध्ये अविश्वासाचे वातावरणाचे निर्माण होण्यामधील अनेक कारणापैकी हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे.  
एकंदरीतच पारस्परिक सामंजस्याच्या अभावी हे वेगवेगळे गट आपली विशिष्ट ओळख कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. या राज्याला लागून ३५० कि. मी. ची ब्रह्मदेशाला लागून आंतरराष्ट्रीय सीमा आहे. यात पूर्वेला अप्पर बर्मा, तर आग्नेये ला बर्माच्या चीन हिल्स आहेत. याशिवाय उत्तरेस नागालैंड, दक्षिणेस व नैरृत्येस मीझोराम व पश्चिमेस आसाम या राज्यांच्या सीमा आहेत. राज्यात ९ प्रशासकीय जिल्हे असून त्यातील चुराचांदपुर, उखरुल, चंदेल, तामेंगलांग, व सेनापती हे ५ जिल्हे हे डोंगराळ प्रदेशातील तर इंफाल, पूर्व इंफाल, पश्चिम बिशेनपुर व थाउबल हे चार जिल्हे सखल भागात आहेत.
१८९१ मध्ये ब्रिटिशांनी हा प्रदेश आपल्या ताब्यात घेण्यापूर्वी येथे राजाची सत्ता होती. भारतातील इतर संस्थानांप्रमाणेच ब्रिटिशांनी येथील संस्थानांच्या सवलती कायम ठेवल्या. पण त्यांच्या  वसाहतवादाच्या,  संस्थानाया अंतर्गत बाबीत हस्तक्षेप न करण्याच्या वरपांगी धोरणा च्या आंत मात्र फोडा आणि तोडा या नीतीचा तेथे अवलंब करण्यासाठी ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा उपयोग करून घेतला.
बिर्टिश सत्तेच्या झेंड्या पाठोपाठ १८९४ मध्ये ख्रिश्चन धर्मप्रसारक येथे प्रवेश करते झाले. त्यांनी वैद्यकीय सेवा व शिक्षण प्रसाराच्या नावाखाली येथील असंतुष्ट जमातींचे धर्मांतरण घडवून आणण्यास सुरुवात केली. १९०१ च्या जनगणनेनुसार येथे ६०% हिंदू, ३६ टक्के जनजाती, ४ % मुस्लिम व केवळ ८ ख्रिश्चन होते. २००५-०६ च्या National Family Health Survey च्या अहवालानुसार २००१ च्या जनगणनेची स्थिती हिंदू ५३. १% मुस्लिम ८. ९% ख्रिश्चन २६. १% व अन्य ११. ९% असे आहे. (source:दुवा क्र. १). याचाअ अर्थ डोंगराळ भागात राहणारी संपूर्ण जनजाती ही ख्रिश्चन झाली आहे.
भारतीय समाज धर्मांतरणाच्या बाबतीत फारसा जागरूक कधीच नव्हता कारण धर्मांतरण हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे तो मानतो. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण होण्यामागचे काय कारण असावे? तर ख्रिस्ती धर्मप्रसारक हे धर्मांतरण करताना ते स्थानीय जनजातींना त्यांच्या देशाच्या मुख्य भूमीपासूनच  वेगळे करत नाहीत तर त्यांनी धारण केलेल्या धर्मामुळे देशाच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रवाहात येण्यापासून प्रतिबंधित करतात. यामुळेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा काळात हे नवख्रिश्चन देशाच्या सांवैधानिक एकात्मतेच्या मार्गात मोठा अडथळा ठरू पाहत आहेत. राज्यातील हिंदू माईती व डोंगराळ भागातील ख्रिश्चन जमाती यांच्यातील वाढती सामाजिक व सांस्कृतिक दरी ही त्यांच्यातील सामाजिक व राजकीय वितुष्टाचा मुद्दा झालेली आहे.
ब्रिटिश सोडून गेल्यानंतर १५/१०/१९४९ मध्ये  मणीपूर हे भारतीय संघराज्यात part C दर्जाचे राज्य म्हणून विलीन झाले. ब्रिटिशांच्या काळात आधुनिक मध्यम वर्गीय म्हणून जो एक लहान गट उदयाला आला त्याच्याकडे राज्याचे नेतृत्व आले. ईशान्य भारतातील इतर वांशिक गटाप्रमाणेच त्यांना स्वतंत्र भारतातील नवीन लोकशाही राज्यसंस्थेच्या सामाजिक व राजकीय गुंतागुंत समजणे कठिण गेले. त्यांच्यात देशाच्या मुख्य भूमीमधील राजकीय नेत्यांबद्दल परके पणाची भावना निर्माण झाली व ते आपल्या वांशिक अस्मितेच्या राजकारणामध्ये गुंतून राहिले. त्याच काळात पूर्व पाकिस्तानातून येणारे लोंढे, उत्तर भारतातून व्यवसायासाठी येणारे व्यापारी, मजूर व निम्न मध्यम वर्ग यामुळे तेथील लोकसंख्ये मध्ये होत असलेले असंतुलन यांनी त्यांना आपल्या वांशिक अस्तित्वाबद्दल असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
ब्रिटिश काळात वर्चस्व असलेली माइती जमात या नवीन राजकीय वातावरणात आपण मागे पडण्याच्या आशंकेने धास्तावले व आपल्याला मागे टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची त्यांना भीती निर्माण झाली. याच काळात केंद्रातील सत्ताधारी देशाच्या विभाजनामुळे निर्माण झालेल्या  विविध समस्यांना तोंड देण्यात गुंतलेले असल्याने या भागाच्या सांस्कृतिक व सवैधानीक स्थितीची राष्ट्राच्या सांस्कृतिक प्रवाहासोबत सांगड घालण्याच्या दृष्टीने योग्य ते लक्ष देऊ शकले नाहीत. याचा परिणाम असा झाला की येथील समस्या अधिक तीव्र झाल्या. (अपूर्ण)