स्वातंत्र्य की स्वैराचार ?

आज जागोजागीच्या बातम्या येत असतात त्यातल्या बऱ्याच बातम्या स्वैराचारामुळे झालेल्या धिंगाण्यामुळे निर्माण झालेल्या वाटतात.

मला वाटते आज आपल्या मनात स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असेच वाटत असते. आपल्या संस्कृतीत असलेली बंधने आपण घालवली, पण आता आपण ती नाहीशी करताना पुरेशी काळजी घेतली नाही की काय असे वाटू लागते. आज सरकार म्हणते आम्ही आता मोठी सत्ता बनत आहोत. पण रोजच्या जिवनात सामान्यांना मात्र जीवन जगणे कठीण वाटू लागले आहे.

सध्या रोजच्या जीवनांत असे वाटते की शासन करणारे गुंडाराज आणण्याचा प्रयत्नतर करीत नाहीत ना?