पालकांनी काळानुसार बदलायला हवे!

शालेय शिक्षण पद्धतीत काळानुसार बदल होतो आहे किंबहुना झालेला आहे. मात्र या प्रणालीशी निगडित असलेला घटक म्हणजेच विद्यार्थी ,शिक्षक व पालक याच बरोबर संबंधित घटक हे काळानुसार बदलताना दिसत नाहीत.आपले स्वतः:चे तेच जुने विचार मांडताना दिसत आहेत.जर या बदलणाऱ्या काळानुसार पालक,शिक्षक व संबंधितांची विचार सरणी बदलली तर विद्यार्थ्यांचा म्हणजेच राष्ट्राचा विकास हा निश्चित होणार आहे.

यासाठी आपण थोरांनी थोडं काळानुसार मागे वळून पाहिलं पाहिजे.देशाला स्वातंत्र्य मिळाले ते १९४७ साली आणि प्रगतीची वाटचाल सुरू झाली.हे अगदी खरे आहे .पण आज शाळांशाळांतून पाहिलं तर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे असंच चित्र आपणाला दिसतं .मुलांना शिस्त नाही.अभ्यासाचं वेड नाही.सारखी टी.व्ही पाहतात.खेळतात .अशा चर्चा ऐकायला येतात.या बाबींसाठी विचार मंथन होणे आवश्यक आहे ,विचार होतोय सुद्धा मात्र बदल काय होत नाही.याला कारण एकच आजार कळलेला आहे.औषध पण माहीत आहे पण ते घ्यायचं कधी आणि कसं याची कल्पना नाही .त्यामुळे आजार बळावतच चाललेला आहे.

आपल्या समाजाची प्रवृत्तीच अशी आहे हे "काखेत कळसा आणि गावाला वळसा" यासाठीचा उपचार आपल्या स्वतः:च्या जवळच आहे. स्वतः: काही करण्यापेक्षा इतरांवर टिका करणे आपली बुद्धी ,शक्ती वाया घालविणे. आता आपण नेमकं काय करायचं की ज्यायोगे समाजात बदल होईल. आपणाला हे माहीतच आहे की आग लागण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते.इंधन,ऑक्सिजन व पुरेशी उष्णता हे तीन घटक एकत्र आले तरच आग तयार होते.त्याचप्रमाणे विद्यार्थी जर घडवायचा असेल तर विद्यार्थी ,शिक्षक व पालक हे तीन घटक जर एकत्र आले तर निश्चित बदल घडणार.विद्यार्थी घडविणे हि सर्वस्वी जबाबदारी फक्त शिक्षकांचीच नसून पालकांची पण आहे.

या साठी पालकांनी काय केले पाहिजे या विषयी थोडे – पालकांनी जरा भूतकाळात डोकावावे आपला जन्म कोणत्या साली झाला .त्या काळातील समाज व्यवस्था,प्रगती याचा आढावा घ्यावा .लक्षात असे येईल की प्रगती फारशी झालेली नव्हती टी .व्ही हा प्रकार नव्हताच मग आपण शाळा कशी शिकलो .आपले आई वडील आपल्याला अभ्यास करा असे म्हणत होते का? आपला दिनक्रम काय होता.मनोरंजनाची साधने होती काय ? शाळांतून वार्षिक स्नेहसंमेलन व्हायची का? लोकाचा प्रतिसाद कसा होता .त्या नंतर आपल्या काळात टी.व्ही केव्हा आला त्या नंतर बद्दल काय झाला .आपण ज्या वर्गात शिकत होतो त्या वर्गातील आपले वर्ग बंधू भगिनी त्यावेळी काय करत आपण टी.व्ही च्या आहारी गेलो किंवा नाही. हा आढावा पालकांनी घ्यावा.

माझे मनोगत समाजातील या बदलाचा विचार केला .तर १९८५ सालामध्ये प्रत्येक गावांत ग्रामपंचायत कार्यालयात हा टी.व्ही आला. वेळ फार कमी असायचा चार ते साडे चार तास फक्त तरीही गर्दी व्हायची.नंतर तीन चार वर्षात व्ही .सी .आर आले. गावोगावी याची सेंटर्स दिसू लागली मग काय मुलांची चांदी या काळात काहीजण या प्रगतीच्या आहारी गेले. नवनवीन सिनेमे बघायचे शाळा बुडवायची संध्याकाळच्या वेळी पारावर बसायचं अन् शाळकरी मुलींच्या छेड काढायच्या कारण सिनेमांनी आम्हाला दिलेले धडे गिरवणे आवश्यक होत. या प्रकारात जे होते ते आज काय करताहेत व ज्या मुली या मुलांच्या आहारी गेल्या त्यांची स्थिती आज काय आहे .या प्रश्नांची उत्तरे म्हणजे त्या वेळी भरकटलेली(टी.व्हीच्या आहारी गेलेली) मुलं आज मजुरी करत आहेत ,तर मुलींच्या हाती खुरपे आहे.

मात्र ,हिच मुले हि आजची पालक मंडळी झाली आहेत.यांना आपल्या काळात जे काही होते याची पूर्णं कल्पना आहे त्याचे साक्षीदार ते स्वतः: आहेत .काळाबरोबर ती आज बदलली आहेत.मात्र त्यांच्या काळातील जुन्या कल्पना आजही हे आपल्या मुलांवर लादतं आहेत. मुलांना सांगतात,"अरे,आमचे आई बाबा आम्हाला कधी अभ्यास कर असे म्हणतं नव्हते आज आम्ही तुम्हाला सर्व काही पुरवतोय मग शिकायला काय होतंय. मी शाळेत जायचो तेव्हा पायात चप्पल नसायची ,चड्डीला ठिगळे असायची दप्तरबंधा ची पिशवी असायची. शीक लेका नाही तर बोंबलत फिरावं लागलं.

पुढे १९८५ नंतर १९९५साला पर्यंत जर आपण कोणत्याही शाळेची यशोगाथा सांगणारा फलक जर नजरे खाली घातला तर या काळातील निकाल हे कमी लागलेले आहेत असेच लक्षात येते.मात्र १९९५ नंतर मात्र हा निकाल वाढतं गेलेला आहे हे पण जाणवते.मग अचानक असा बदल कसा काय झाला? कारण जाहिराती शहरातील गोष्टी गावात आल्या पुस्तकांची जागा मार्गदर्शकाने घेतली. विचार करून अभ्यास करण्याची प्रवृत्ती संपून घोका आणि ओका हे तंत्र सुरू झाले.शिक्षकाचे काम अप्रत्यक्ष रित्या कमी झाले . परंतु हि मुले खरंच बुद्धिवान आहेत का स्पर्धा परीक्षेसाठी पात्र ठरतात का ? मग प्रश्न उभा राहतो तो मराठी भाषिक मुलांना प्रशासकीय सेवेत नोकरी लागण्याचा तिथ हि मुलं कमी का पडतात .लेखी परीक्षेत भरघोस यश प्राप्त करतात मात्र मौखिक चाचण्यांतून नापास होतात. असे का होते याचेवर विचार होणे गरजेचे आहे.

यासाठी काळाची गरज ओळखून आपणच या गोष्टीवर मार्ग काढायला हवा. तो म्हणजे असा की, आपल्या पालकांनी आपल्याशी कधी सुसंवाद साधला नाही .याचा अर्थ असा नाही की आपणही आपल्या मुलांशी असंच वागावं कित्येक घरातून असं चित्र दिसतं की मुलं वडिलाशी मनमोकळेपणाने बोलत नाहीत ,बोलतात ते फक्त कामापुरते ,मात्र आई बरोबर वाद घालत बसतात. पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या पाल्या बरोबर दररोज सुसंवाद साधला पाहिजे .कारण आपली मुलं हिच आपली संपत्ती आहे असं आपण म्हणतो मग या संपत्तीचे रक्षण व देखभाल करण्याची जबाबदारी हि आपलीच नव्हे का ? सुसंवाद हा कोणत्याही विषयावर असावा की ज्यायोगे विचारांची देवाणघेवाण होईल.सुसंवादाच कौशल्य त्याच्यामध्ये विकसित होईल.कधी दप्तरातील वही पाहून त्यावर चर्चा करावी.शाळेत आज नवीनं काय शिकवील.,शिकलास याबाबत विचारणा करावी.आपल्या कामाच्या धकाधकीच्या जीवनात शाळेत जाऊन भेटणे शक्य नसल्यास मुलाच्या वहीच्या माध्यमातून शिक्षकापर्यंत जाऊ शकतो. मुलांनाही वाटते की पालक अभ्यासाकडे लक्ष देतात.पालकांना असे वाटत की अभ्यासातलं मला काय कळायचं आहे. मुलांना आपल्या पालका बद्दल आदरच असतो आपल्या पालकाला काही येता नाही असा विचारही त्यांच्या ध्यानीमनी नसतो मग आपणच का करावा .

आज मुलं टी.व्ही खूप पाहतात.पण या त्यांच्या सवयींतून मुलं काही शिकतच असतात आपणच म्हणतो की आजची पिढी खूप हुशार आहे .लहान लहान मुलं बघितली की आपण त्यांचे कौतुक करतो.(दुसऱ्याची मुलं) मग आपल्याच मुलाला आपण नाव का ठेवतो ? आज पाचवी सहावी मध्ये शिकणाऱ्या मुलांना जे ज्ञान आहे ते आपल्या काळात आपल्या होतं का उत्तर नाही असंच मिळणार आहे . मग जी सवय मुलांना जास्त आहे त्यामुळे त्यांचं नुकसान का आणि कसं होते. आपण स्वतः:ला प्रश्न विचारून पहा ही मुलं किंवा आपण टी.व्ही पाहतो म्हणजे नेमके काय करतो ,मनोरंजन असंच ना.की स्वतः:ला त्या पात्रात हरवून घेतो. त्याच्या बरोबर हसायचं,रडायचं,रागावायचं अशा भावनामय व्हायचं. हेच करतो ना आपण हळूहळू या पात्रात हरवून जाण्याची सवयच लागते ती एखाद्या व्यसनासारखी लाइट नसली की ही मुलं बेचैन होतात कुठेही लक्ष लागत नाही.खेळतात मात्र लाइट आल्याचा आनंद त्यांना जास्त होतो असे लक्षात येते. मग यांना या व्यसना पासून परावृत्त कसे करायचे हा मोठा प्रश्न आहे .पालक मारणे हा पर्याय निवडतात याने मुलं स्वतः:पासून दुरावली जातात. त्याची सवय मात्र बदलत नाही. यासाठी पालकांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे .यासाठी मुलांच्या बरोबर बसून टी.व्ही पहा मात्र मुलांना त्या पात्रात हरवू देऊ नका यासाठी नकळत पणे त्याला प्रश्न विचारा की,तो काय करतोय त्याचं नाव काय वगैरे वगैरे यामुळे काय होईल तर मुलं एकटक टी.व्ही कडे पाहत होती ती तुमच्या प्रश्नाकडे लक्ष देतील त्याची उत्तरे देतील. याची तुलना ती शाळेतील कामाशी करतील की लक्ष देऊन ऐकलं पाहिजे जसे आई बाबा विचारतात त्या प्रश्नांची उत्तरे आपण देतोय तसेच शाळेत शिक्षकही विचारतात त्यांनाही उतर देता येते.विचार करण्याची सवय जी कालबाह्य झाली आहे ती वाढेल. 

हळूहळू टी.व्ही पाहण्याची सवय कमी होईल.त्याला मार्गदर्शकापेक्षा पुस्तकांचे वाचन करण्याची सवय लावा.आपण तासनतास वर्तमानपत्र वाचण्यापेक्षा मुलांच्या समोर त्याच्याच दप्तरातील एखादे पुस्तक काढून वाचा की त्याला वाटेल माझ्या पुस्तकात असे काय आहे की बाबा ते वाचतायत तो स्वतः: ते वाचेल.

पालकांनी स्वतः: मध्ये बदल करून पाहावा काळाचे आपणाला हेच आव्हान आहे .स्वतः: साठी नाही तरी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपले जुनाट असलेले विचार बाजूला ठेवून नवीनं प्रवाहात सामील व्हायलाच हवे