प्रथम आमसुले ३ वाट्या पाण्यात अर्धा तास भिजत घालावीत. नंतर हेच पाणी आमसुलांसकट उकळायला ठेवावे. एक-दोन उकळ्या फुटल्यावर गार होऊ द्यावे. हाताने आमसुले कोळून घ्यावीत व चोथा टाकून द्यावा. दोन-तीन आमसुलांचे तुकडे उरले तरी चालते.
दुसऱ्या एका जाड बुडाच्या पातेलीत तेल तापवायला ठेवावे. चांगले तापल्यावर जिरे-मोहोरीची फोडणी देऊन , हिंग, कढिपत्ता, मिरच्या टाकून आमसुलांचे पाणी घालावे. मग तिळाचे कूट, दाण्याचे कूट, गूळ, मीठ इ व्यवस्थित चवीप्रमाणे घालावे व ढवळून उकळी येउ द्यावी. घट्टपणा पळीवाढी असावा... म्हणजे पानात वाढल्यावर एकदम धावत नको सुटायला पण घट्ट गोळाही नको!
आंबट-गोड- तिखट अशी हि 'डिप' कशाही बरोबर खाता येते... पण सणाच्या स्वयंपाकात डावीकडे जास्त महत्त्वाचे असते!
हवं असल्यास थोडं लाल तिखटही घालू शकतो.
सासूबाई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.