लोकनेत्यांचे अनर्गल प्रलाप

भारतातील लोकनेते अलीकडे मनात येईल तसली विधाने करू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या राज्यांत तर अशा ताळतंत्र सोडून केलेल्या वक्तव्यांना ऊत आला आहे. वेदांत सर्वच ज्ञान असणे, गाय, गोमूत्र, प्राचीन तथाकथित विज्ञान, विमानविद्या, अग्न्यस्त्रे, सीता (टेस्टट्यूब बेबी) असल्या विषयांवर बेधडक विधानांचा हल्ली पाऊस पडत आहे. राहुल गांधीसुद्धा दिवसेंदिवस जास्तच विक्षिप्त निवेदने करू लागले आहेत. अधिकाधिक प्रगल्भ होत असलेली जनता मात्र ह्या विधानांनी स्वत:ची मनसोक्त करमणूक करून घेऊ लागली आहे. अशीच काही बेछूट विधाने आणि त्यावरती लोकांच्या प्रतिक्रिया प्रस्तुत लेखात मांडल्या आहेत.

वाचकांनी लेख वाचावा आणि त्यांत भर घालावी.

'''माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते.''' (संभाजी भिडे)

प्रतिक्रिया :

संभाजी भिडे नव्हे तर संभाजी आंबा भिडे.

आता 'मन कि बात'मध्ये साहेब भक्तांना या आंब्याची माहिती सांगतील व भक्तांची लोकसंख्या वाढवत ५० वर्ष सत्तेवर राहतील.

भिडे गुरुजींनी आंबा खाल्ला असता तर त्यांच्यासारखेच सँपल तयार झाले असते.

प्रेयसीची धमकी - करतोयस लग्न की खाऊ आंबा.

पोट वाढलेल्या मुलीस आधी म्हणत - कुठे शेण खाल्लेस; आता म्हणतात कुठला आंबा खाल्लास?

लग्न न केलेल्यांनीही आंबे खावेत का असा प्रश्नही काहींनी विचारला आहे..

बाबा रामदेव आणि भिडे गुरुजींनी एकत्रितपणे आंब्याचा व्यवसाय सुरू करावा असा सल्ला काहींनी दिला आहे.

फणसाच्या सीझनमध्ये आंब्यांना मागणी वाढली आहे.

आंबे खाऊन बा होता येत नाही, आणि पगडी बदलून ज्योतिबा होता येत नाही ! (शरद पवारांना टोमणा)

कालपासून विशिष्ट प्रकारच्या आंब्याला (भिडे आंबा) खूप भाव आला आहे.

मी रामदेव बाबा पहिला होता;
हा तर "आम"देव बाबा निघाला.

पुरुषांनो भूतलावर नीट रहा या पुढे; तुमची गरज संपली बरं का! भिडे आंबे बाजारात लाँच झालेत!

आमच्या बागेतले आंबे खाल्ले तर मुलं होतात- संभाजी भिडे. आमच्या बागेतले आंबे खाल्ले तर जुलाब होतात... - एक पुणेकर

त्या तिकडे धरणापलीकडे भिडे गुरुजींच्या आंब्याचं झाड आहे. - एका विदेशी माणसाला धरण दाखवताना नरेंद्र मोदी.

मागे एक न्यायाधीश म्हणाले होते "लांडोर मोराचे अश्रू पिते म्हणून तिला पिले होतात... " आता भिडे गुरुजी म्हणतात, " त्यांच्या शेतातील आंबे खाऊन मुलं होतात " गड्या आत्ता लक्षात आले ... 'नाचरे मोरा आंब्याच्या वनात' हे खरंच "बाळ"गीत आहे....

Sambhaji Bhide’s Farm Man’go’ should be called Man’Cum’

But I am an unmarried. I can’t have Mangoes from his farms. Sorry !

जी मुले भविष्यात समाजात विकृती निर्माण करतील अशा मुलांना स्त्रियांनी जन्मच देऊ नये. ( इति मध्यप्रदेशातील गुणा मतदारसंघाचे भाजप आमदार पन्नालाल शाक्य)

मीच पहिला! (अटल बिहारी बाजपेयींना रुग्णालयात भेटून आल्यानंतर राहुल गांधींचे उद्गार)

'कोका कोला' या आंतरराष्ट्रीय शीतपेयाचा निर्माता एकेकाळी सरबत विकत असे तर 'मॅकडोनल्ड्स'चा मालक रस्त्याच्या कडेला ढाबा चालवीत असे. (राहुल गांधी)