हरबरा डाळीचे पीठ व साजूक तूप कढईत एकाच वेळी घालून मध्यम आचेवर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेणे. सतत ढवळत राहणे नाहीतर पीठ करपेल. भाजून झाल्यावर गॅस बंद करणे. नंतर लगेच त्यात १ वाटी साखर घालून परत हे मिश्रण ढवळून एकसारखे करणे. खूप गार झाल्यावर लाडू वळणे.
ज्यांना कमी गोड आवडते त्यांनी पाउण वाटी साखर घालावी. लाडवामध्ये वेलची पूड किंवा बेदाणे आवडत असल्यास घालणे. नाही घातले तरी चालते.
तूपाचे प्रमाण वर दिल्याप्रमाणेच घालावे. पण डाळीचे पीठ पूर्णपणे तूपामध्ये भिजायला हवे, त्याप्रमाणे तूपाचे प्रमाण कमी जास्त करावे. तूप थोडे जास्त झाले तरी चालेल पण कमी नको. १ वाटी डाळीच्या पीठाचे छोटे छोटे आठ लाडू होतात.
रोहिणी
बरेच दिवस टिकतात. साजूक तुपातले चवीला जास्त चांगले लागतात.
सौ आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.