प्रथम तांदुळ पिठी व कणिक एकत्र करुन ठेवावे. मग २ वाट्या पाणी उकळवत ठेवावे त्यात चिमुटभर हळद,तिखट,हिंग व चविपुरते मिठ घालावे , २ चमचे (टेबल स्पून) तेल घालावे , पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करावा व त्यात पिठाचे मिश्रण घालावे. थोडे थंड होऊ द्यावे मात्र कोमट असतानाच चांगले मळावे व चकल्या पाडाव्यात व गरम तळणित तळुन घ्याव्यात.
भाजणी करणे अथवा विकत मिळणे शक्य नसल्यास अतिशय चांगला पर्याय आहे. चविला पण छान होतात.
सौ.आई.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.