प्रथम तांदुळ धुवुन ठेवावे. टोमॅटो चिरुन मिक्सर मधुन वाटुन घ्यावे.प्रेशरपॅन मध्ये १ मोठा चमचा तुप टाकावे. त्यात तमालपत्र टाकावे.कांदा घालून लालसर होईतो परतावा.मग त्यात तांदुळ टाकुन २-३ मि. परतावे.
एक वाटी तांदुळाला दोन वाट्या टोमॅटोचा रस लागतो. दोन वाट्या रस घालावा.त्यात दोन चमचे लाल तिखट,पाउण चमचा दालचिनी पूड,पाउण चमचा जीरे पूड,मीठ,थोडी साखर घालुन २-३ शिट्या झाल्या की गॅस बंद करावा.
वाढताना वरुन कोथिंबीर,ओला नारळ घालून सजवावे. हा भात लाल रंगाचा असतो.त्यामुळे सजलेला भात लाल-पांढरा- हिरवा असा दिसतो.
जोशीकाकू
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.