मानवजन्म ही नैसर्गिक प्रक्रीया आहे .माणुस जन्माला आल्यावर त्याला माहीत असते का त्याचा धर्म कोणता ,जात कोणती ते ? तर नाही. जसाजसा तो मोठा होत जातो त्याला कळु लागते . आपल्या धर्माबाबत. मानवाने आपल्या तल्लख बुद्धीने निरनिराळे शोध लावले. त्याप्रमाणे आपल्या राहणीमानात बदल केले.तरी पण श्रेष्ठ कोण हा प्रश्न उरतोच कारण प्रत्येक माणसाला धर्म आहे. त्याबरोबर विज्ञानाची जोड आहे.प्रत्येक जण निसर्गात वावरतो.
प्रत्येक धर्म हा मानवनिर्मित आहे. विज्ञान(तंत्रज्ञान) ही मानवनिर्मित आहे. निसर्गातिल प्रत्येक घटकाच्या मागे विज्ञान आहे. जन्मानंतर मृत्यु हे नैसर्गिक आहे ते कोणी थांबवू शकत नाही. तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली तरी विज्ञान सर्व गोष्टींवर मात करू शकत नाही. निसर्गाच्या प्रकोपापुढे सर्व काही समान आहे(उदा. धरणीकंप, चक्रिवादळे,इ) .
मला वाटत निसर्ग श्रेष्ठ . आपणास काय वाटत.
आपला
कॉ.विकि