तांदुळाचे पीठ ताकात पातळसर भिजवून घ्या,गुठळ्या मोडा, त्यात मीठ व किंचीत साखर घाला.कांदा चौकोनी चिरा,लसूण पाकळ्यांचे उभे पातळ काप करा.आल्याचेही उभे पातळ काप करा. तेल गरम करा,त्यात मोहरी घाला,तडतडली की हिंग,कढीपत्ता,मिरच्या घाला.कांदा व लसूण घाला,झाकण ठेवून २ वाफा येऊ द्या. नंतर तांदुळाचे ताकात भिजवलेले पीठ घाला, ढवळा.झाकण ठेवून २,३ वाफा येऊ द्या. शिजली की खोलगट बशीत वाढून आळे करून त्यात कच्चे तेल घाला. गरम गरम खा.
आताच रोहिणीची उकड वाचली आणि आठवण झाली,म्हणून मनोगतींसाठी इथे ही पण एक उकड पाकृ देत आहे. (या प्रकारात हळद घालत नाहीत व कांदा,लसूण शिजताना घालतात.)
माझी आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.