खरे अल्पसंख्याक कोण?

काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून नेहमीच कोणते ना कोणते कारण काढून जात, धर्म या विषयावरून राजकारण पेटते आहे, पेटवले जात आहे. सत्ता काँग्रेसची असल्याने हे अपेक्षीतच होते. पण आता सगळ्याचा अतिरेक होतो आहे असे वाटते आहे.
भारतात जो तो उठून स्वतःला अल्पसंख्याक म्हणवून घेतो आहे. अल्पसंख्याक असण्याची नेमकी व्याख्या काय आहे? की ज्यांना बहुसंख्य म्हटले जाते तोच समाज आता अल्प राहिला आहे? भारताचे असे नक्की किती तुकडे केले म्हणजे प्रत्येकाला स्वतःचा हक्क मिळेल? काही पक्षांना धर्मांध ठरवून, सतत जातीचे अन धर्माचे राजकारण पेटते ठेवणारे स्वतःला निधर्मवादी म्हणतात हे योग्य आहे का?
या सगळ्यात भारताचे भविष्य काय? आम्ही स्वतःच गुलाम बनलो आहोत काय राजकीय स्वार्थाचे? भारताच्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर हक्क सांगणारे नेहमीच अल्पसंख्याक  असतात. या सगळ्यावर स्वतःच्या मार्गाने तोडगा काढून भारता बाहेर जाणारे जिथे जातील तिथे अल्पसंख्याक म्हणवले जातात. पण मग खरे अल्पसंख्याक कोण?


तुम्हाला काय वाटत?