मार्च
२९
२००७
माणूस माणसासाठी आतशा धावत नाही
अन् देवळातला गोटा तर कधीच पावत नाही
झरतील कुणाचे अश्रू, फुलतील सुगंधी बागा
मी उगीच या वाटेवर जखमांना लावत नाही
तळव्याला तुझ्या खुलवते नावांची नाजुक नक्षी
पण मेंदीच्या रंगाचे जगण्याशी भावत नाही
तू कधी मायही माझी, माझी तू कधी प्रियाही
तू फक्त ठोकळ्यामध्ये शब्दांच्या मावत नाही
काचेच्या पाठीमागे ही पक्वान्नंची गर्दी
हे बरे वास घमघमता वार्यावर धावत नाही
बापाच्या डोक्यावरती शेणामातीचे डाले
संकोचून रुमाल मीही नाकाला लावत नाही
मी पडतो-झडतो रडतो अन् पुन:पुन्हा धडपडतो
पण कधीच हरण्यासाठी मी शर्यत लावत नाही
या द्युतामधे कितीदा मी स्वतः पणावर चढलो
पण स्वत्व कधी मी माझे डावावर लावत नाही
-गणेश एस्.एम्.
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
छान
प्रे. मिलिंद फणसे (गुरु., २९/०३/२००७ - २०:०६).
गझल आवडली
प्रे. चक्रपाणि (शुक्र., ३०/०३/२००७ - ००:४१).
छान
प्रे. पुलस्ति (शुक्र., ३०/०३/२००७ - ०३:४२).
वाव्वा!
प्रे. चित्त (शुक्र., ३०/०३/२००७ - ०५:४०).
वा..
प्रे. केशवसुमार (शुक्र., ३०/०३/२००७ - ०८:४१).
रुमाल, द्युत
प्रे. लिखाळ (शुक्र., ३०/०३/२००७ - ०९:३७).
तू कधी मायही माझी, माझी तू कधी प्रियाही
प्रे. मानस६ (शनि., ३१/०३/२००७ - १७:३९).
ठोकळ्यामध्ये शब्दांच्या
प्रे. मानस६ (शनि., ३१/०३/२००७ - १७:४१).
का?
प्रे. शिवश्री (सोम., ०२/०४/२००७ - ११:५९).
मध्ये/मधे
प्रे. महेश (सोम., ०२/०४/२००७ - १२:३३).
काही प्रतिसाद काढले
प्रे. प्रशासक (सोम., ०२/०४/२००७ - २०:०४).