का बिघडले आहे
देशाचे तंत्र?
येऊन एखादा महापुरुष, देईल का देशाला
प्रगतीचा मंत्र?
कधी सापडेल देशाला भ्रष्टाचारावर
मात करण्याचे सूत्र?
कधी मिळेल देशाला
प्रगत देशाचे छत्र?
कधी संपेल बेरोजगारीचे
जीवघेणे सत्र?
कधी वागेल जबाबदारीने या देशातला प्रत्येक गण आणि आणेल ताळ्यावर
देशाचे तंत्र?
आणि मग खऱ्या अर्थाने सफल होईल
गण-तंत्र!
आणि सफल होईल
मिळालेले स्वातंत्र्य!