मागणे

जेव्हा जेव्हा राष्ट्रधर्मास ग्लानी येते

वीरपुरुषा, तेव्हा तेव्हा तू जन्म घेतलास!

विक्रमापासून शिवाजीपर्यंतची

सारी चरित्रे तुझी साक्ष देतात ॥

हे वीरपुरुषा,

तुझ्या नव्या अवताराचा उषःकाल होत आहेसे वाटते !

प्रार्थना एकच करतो की

व्यक्ती म्हणून पुन्हा जन्म घेऊ नकोस;

व्यक्ती-व्यक्तींमधून व्यक्त हो!

कारण,

व्यक्तीपूजेनंच आमची वीरता

आज विदीर्ण केलीय,

मनं संकुचित केलीयत ॥

                                                                ऱ्यशवंत जोशी