नाइलाज

आयुष्यात अशीच माणस हतबल असतात;

जि अस्तित्वापासून खूप लांब असतात,

शिक्षा अश्यानाच होते;

जे कधिही दोषी नसतात.

प्रत्येकजण जगत असतो;

ज्याच्या त्याच्या आयुष्याचा प्रांत;

आजच्या चांगल्या वागण्याची शिक्षा कधी;

याची सगळ्यानाच असते भ्रांत.

अस म्हणतात दैव आपल्याला;

तुम्ही जे दिलं तेच परत देतं;

पण तुमच्या अस्मितेची किमत घेऊन;

डोंगरा एवढं आयुष्य देऊन जातं.

पुन्हा होतो तोच प्रवास सुरू;

चांगल करून सुद्धा शिक्षा भोगण्याचा;

रोज रोज मरूनसुद्धा;

हसत हसत जगण्याचा