तीन वलये

निसर्गाने दिलेले दान जेव्हा अधिर झाले

तूं मला अन् मी तुला सम सामावून घेतले ॥

अपुल्याकडोनी हवे होते ते तयाने साधले

वेगळाल्या वलयी पुन्हा कोंडूनी आम्हा टाकले ॥

मातृत्वातची तूं स्वतःला विरघळवूनी घेतले

विरंगुळा शोधताना परी मन माझे भरकटले ॥

जाग येता तुला कधी वलय तुझे धास्तावले

वलयात अन् शिरुनि माझ्या मनास तूं चुचकारले ॥

वलय तिसरेही निरागस अपुल्या वलयी तरंगले

निसर्गाने दिले दान पुन्हा निखळ आनंदाचे लेणे ॥