आताशा मी कोणाशीच attach होत नाही..
कोणाशीच वेवलेंथ माझी match होत नाही ..
कोणी हसून बोललं तर मीही तोंडभर हसतो ..
बोलायलाच पाहिजेत म्हणून 2 वाक्य बोलतो ..
इनोसंट प्रेमाची आता भीतीच वाटते जरा
मैत्री बित्री प्रकार फक्त फेसबूक वरच बरा
विचारलाच कुणी तर म्हणायचं "I'm fine "
नकोच वाटल बोलायला तर जायचं offline.
मन आता घेत नाही कोणाकडे धाव ..
राहत फक्त कुरवाळत चिघळलेले घाव .
संपलेत मित्र राहिलीयत फक्त प्रोफेशनल नाती
सांभाळायची फक्त वीकेंड मजेत घालवण्यासाठी ..
मन झालाय प्लास्टिक आता होत नाही ओलं
कळलंच नाही कधी आपल्याच कोशामध्ये गेल ?
मित्रांचेही फोन आता सोयीनुसार घेतो ..
पत्ता विचारलाच कोणी तर ...... फेसबूक id देतो !