संध्याकाळ
चल जाऊयात रे तिकडे
जिकडे कुणीच नाही
या अनोळख्या गर्दीची
सवय मला मुळीच नाही
चालतो सूर्य रोजच
त्याची अस्ताची चाल
तरी प्रतिक्षेत त्याच्या
संध्या होते लाजून लाल
कसे एकटे असून सारे
एकटे काहीच नाही
जो वाजवितो बासरी
त्याच्या संगितात ही गोडी
तालावर त्याच्या नाचते
समुद्र लाटांवर ती होडी
कसे निशब्द असून सारे
अबोल काहीच नाही
तेजोमय करून जगाला,
दिवसाचा निरोप घेतो रवी
शब्दांचे मागणे मागत उभा,
समुद्र किनाऱ्यावर हा कवी
आज लिहिण्यासारखे
माझ्याकडे काहीच नाही
माझे नसून काही
परके मला ते नाही
-- मयुरेश कुलकर्णी