आज वाटलं... जाता जाता
तुला सहज भेटून जावं
तुझ्याही डोळ्यांच्या कडा
दाटून येतात का... पाहून जावं !
तुझ्या आठवणींची जळमटं
मी कधीचीच काढून टाकलेली
पण पाहते पुन्हा तर...
ती नव्यानेच उगवलेली !
तसे पाहिले तर या जगामध्ये
आपला तसा कुणीच नसतो
खडतर काळी जो साथ देईल
आपण त्याचेच ऋणी असतो !
दुःख असतं नेहमी आभाळाएवढं
अन सुख........ पसाभर
कारण दुःखालाच अधिक कुरवाळण्यावर
आपला असतो भर !