मला आवडलेली १ कविता

आता जगायचे असे माझे किती क्षण राहिले


माझ्य धुळीचे शेवटी, येथे किती कण राहिले


हृदयात विझला चंद्रमा नयनी न उरल्या तारका


नाही म्हणायाला तुझे, हे आपुलेपण राहिले


होता न साधा एव्हढा जो शब्द मे तुजला दिला


एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण राहिले


ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे


मी मात्र थांबून पाहतो, मागे किती जण राहिले